News Information Entertainment

Search
Close this search box.

पत्रकारांनी बातमी करताना कोणाच्याही दबावाला बळी पडता कामा नये : अशोकराव वानखेडे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

न्यूज १८ चे पत्रकार गोविंद वाकडे यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड

पुणे : पत्रकारांनी आपल्या बातमी ला न्याय देताना कधीही राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडता कामा नये. तसेच सुड बुद्धीने आपण पत्रकारिता करत नसेल तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. असे मत ऑल इंडिया जरनालिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार पदाधिकारी निवड करताना व्यक्त केले.

न्यूज १८ चे पत्रकार गोविंद वाकडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकारी यांची निवड आणि सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी वानखेडे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक हेमंत देसाई उपस्थित होते . यावेळी हेमंत देसाई यांनी सर्वसामान्य जनतेला आपल्या पत्रकारितेचा फायदा झाला पाहिजे. तसेच ग्रामीण भागातील चित्र सर्वच माध्यमांनी पुढे आणले पाहिजे. सध्या नको त्या गोष्टी दाखवण्याची स्पर्धा लागलेली असते. ती बंद झाली पाहिजे. पत्रकारांनी सडेतोड भूमिका मांडली पाहिजे असेही देसाई म्हणाले. नूतन प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांनी यापुढे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून शासनाच्या सर्व योजनांचे जिल्हानिहाय सर्व्हे करून त्यासंदर्भातील अहवाल जाहीर केले जाणार असल्याचे सांगत सरकार आणि जनता यामधील दुवा म्हणून पत्रकार संघ काम करेल अशी भूमिका स्पष्ट केली.
यावेळी गोविंद वाकडे आणि पदाधिकारी यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या. राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष व राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. संघनेचे संस्थापक संजय भोकरे आणि रणधीर कांबळे,विश्वास आरोटे महाराष्ट्र विभाग अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या उपस्थित ही निवड करण्यात आली.यावेळी राज्यातील विविध जिल्हा प्रतिनिधी व पत्रकार बांधव मोठ्या संखेत उपस्थित होते. दरम्यान आपली भूमिका मांडताना नव नियुक्त प्रदेश अध्यक्ष यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांचा विकास आणि सुरक्षेला प्राधान्य देण्याबरोबरच संघटना महिला पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबध्द राहील असं आश्वासन दिले.

पत्रकारांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील विविध भागात संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. पत्रकारांच्या समस्या व आव्हाने याबाबतीत चर्चा झाली. आज पर्यंत संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी मांडला.नवीन कार्यकारणीचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.
दरम्यान संघटनेचा प्रमुख विभाग असलेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागासाठी ज्येष्ठ पत्रकार सचिन चपळगावकर तर कोकण विभागासाठी नवनाथ कापले यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकारी पत्रकार हल्ला कृती समितीच्या माध्यमातून संघटनेला आणि पत्रकारांना ताकद देतील असा विश्वास देखील अध्यक्ष वाकडे यांनी व्यक्त केला.

डिजिटल मीडिया चे अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, महारष्ट्र विभागीय अध्यक्ष नितिन शिंदे, संपर्क प्रमुख वैभव स्वामी, सहसंपर्क प्रमुख पराग कुंकुलोळ, पुणे जिल्हा अध्यक्ष संजय जगदाळे,प्रसिद्धि प्रमुख नवनाथ जाधव, उपाध्यक्ष अशोक देढे, अतुल क्षीरसागर, जमीर सय्यद, महादेव मासाळ,बेलाजी पात्रे, सुनील बेनके, आदी मान्यवर पत्रकारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

Author:- Jamir Sayyed

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool