दिल्लीतील वायूप्रदूषणाच्या गंभीर समस्येवर सुप्रीम कोर्टाने कडक भूमिका घेतली आहे. कोर्टाने दिल्ली-एनसीआरमधील सर्व शाळांचे वर्ग बारावीपर्यंत तात्काळ स्थगित करण्याचे आदेश दिले, तसेच वायूप्रदूषण नियंत्रणासाठी GRAP-IV (Graded Response Action Plan) चे सर्व टप्पे कठोरपणे अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत. AQI कमी जरी झाला तरी हे निर्बंध लागू राहतील.
अधिकार्यांच्या उशीर झालेल्या कृतींवर कोर्टाने नाराजी व्यक्त केली आणि सांगितले की नागरिकांना प्रदूषणमुक्त वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. पुढील सुनावणी 22 नोव्हेंबर रोजी होणार आहे
